वटपौर्णिमा

Mon, 05 Jun, 2023 05:24
अशीच एक वट पौर्णिमा

आज वटपौर्णिमा सकाळी लवकर देवपूजा झाली आणि सुलभा आणि मी बाजारामध्ये गेलो बाजारामध्ये वटपौर्णिमेच्या साहित्याचा दुकानात गेलो त्या ठिकाणी एक वाटा 50 रुपये असा होता मग सुलभा आणि पूजा दोघींना जायचं असल्यामुळे दोन वाटे घ्यायचे होते परंतु त्यामध्ये अंबा मात्र खराब झालेला होता आता हे पाहिल्यावर सुलभाने लगेच हुज्जत घालायला सुरुवात केली मला मात्र कंटाळा आला होता ऊन वाढत होते मी म्हटलं चला घ्या मिळल तो आंबा परंतु ते म्हटले पूजेसाठी खराब आंबा कशाला घ्यायचा शक्यतो देवाला चांगलंच फळ दिले पाहिजे, हा विचार तिच्या मनात आला आणि मग दुसऱ्या दुकानातून आंबे खरेदी केले ते जरा महाग पडले पण तरीसुद्धा दुसरे आंबेच घेतले म्हणजे देवपूजा करताना मनामध्ये असं की नको असतो की देवाला आपण चांगल्या वस्तू दिल्या नाही. त्यामुळे देव नाराज होईल देवाचा कोप होईल आपली पूजा व्यर्थ जाईल या भावनेतून असं घडत असतं पण खरे तर तसं पाहिलं तर त्या वडाच्या खाली असलेला तो आंबा कोण खातो का ?ते सगळे निर्माल्य होत असतं ,परंतु जो पूजा करतो त्याची भावना फार महत्त्वाची हे यातून मला समजलं मी जरी रागावलेला असलो तरीसुद्धा सुलभाच्या त्या वागण्यातून सत्यता मला दिसलीं . आणि ही सत्यता फार महत्त्वाची आहे ही धार्मिकता महत्त्वाची आहे आणि हीच खरी पूजा असते समजा आपण खराब फळ घेतल असतं तर मनात कुठेतरी राहिलं असतं की आपली पूजा व्यर्थ गेली ,आणि देवाला काय वाटलं असतं यांनी चांगलं फळ दिले नाही शेवटी आत्मा व परमात्मा याचं एकत्र व्हायचं असतं हे यातून आपल्याला दिसतं आणि हे आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे तरच माणसाचं जीवन हे सार्थकी लागतं मग करायचे म्हणून पूजा केली करायचा खर्च म्हणून केला परंतु हा खर्च व्यर्थ जात नाही ना याचा शांतपणे विचार करायला हवा रागावल्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टीचा भान राहत नाही परंतु मन शांत असेल तर यातून योग्य तेच घडत असतं म्हणून मन शांत हवे व्यवहारात कुठेतरी गेलो तरी मन शांत पाहिजे चित्त शांत पाहिजे चित्त ईश्वर नष्ट पाहिजे म्हणून देवाला सद्भावनेची फुल वाहन गरजेच आहे आणि ते फुल स्वच्छ असावं मनासारख असाव ते फुल जस आहे तसंच आपलं मन आहे असं ईश्वर मानत असतो अशी भावना असते म्हणून दुकानदाराने सुद्धा विकायचं म्हणून काहीही विकायचं हे बरोबर नाही केवळ स्वतःचा नफा पाहायचा परंतु गिऱ्हाईकाचा भक्त भाव सुद्धा पाहणं गरजेचं आहे यातूनच मला हे सांगायचं की भावना कशी असावी सदभावना कशी असावी प्रत्येकाने ओळखणे गरजेचे आहे आणि म्हणूनच ती खरी पूजा घडत असते. मंदिराभोवती खूपच गर्दी होती बऱ्याच महिला नटून सजून वडाला दोरा गुंडाळण्यासाठी आल्या होत्या अंगावर लाखो रुपयांचे दागिने बरोबर आपल्या पतीला घेऊन आले होते .त्या वडाच्या साक्षीने सेल्फी काढण्याचा प्रोग्राम चालू होता या भक्तीमध्ये कुठेतरी फेसबुकला व्हाट्सअप ला आपला फोटो गेला पाहिजे आणि मी किती छान वटपोर्णिमा साजरी केली याचं सुंदर प्रदर्शन त्या करत होत्या आमचा नातू साई तर मंदिरामध्ये इकडं तिकडं धावत होता आणि प्रत्येकाकडं कुतूहलाने पाहत होता बऱ्याचशा बाया बापड्या आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना समोर घेऊन फोटो काढत होत्या आणि हे शांतपणे तो वड पहात होता प्रत्येक जण स्वतः अतिशय सुंदर दिसण्याचे प्रयत्न करत होत्या यामधील आदर कुठे दिसत नव्हता भक्ती भाव कुठे दिसत नव्हता समोर वडाला मात्र करकचून दोरा गुंडाळलेला होता आणि त्याच्या पायाशी आंबा फुलं आणि ओटीचे सामान ठेवलेलं होतं आणि अशा रीतीने एक वेगळी अशी वटपौर्णिमा सध्या साजरी होत आहे यामध्ये किती भारी साड्या किती भारी दागिने आणि किती सुंदर नटन मुरडणं हे दिसत येत होतं आणि ते वडा साक्षीने तो वड सुद्धा मनातल्या मनात विचार करत असेल कारण ते झाड फार पुरातन आहे की ज्या फोटो काढत होत्या त्यांच्या सासवा पण आजसासवा सुद्धा या ठिकाणी प्रदक्षिणा करून गेल्या होत्या आणि त्यांना प्रत्यक्ष या वडाने पाहिलेलं होतं आणि तो भक्ती भाव होता तो आदर होता तो आदर इथं कुठे दिसतच नव्हता आदर असावा कुठे हे आपण मनातच ओळखलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं की वडाचे फांदी तोडून ती एका कुंडीत लावली जाते आणि स्टूल वर ठेवायचं आणि तिच्या भोवती शहरांमध्ये फेऱ्या मारायच्या आणि अशा रीतीने ती वटपौर्णिमा साजरी करायची हे सत्य आहे का हे पर्यावरण आहे का पर्यावरण पूरक आहे का ? याचा विचार केला पाहिजे हिंदू संस्कृतीमध्ये जे काही घडलेला आहे त्याचा गूढ असा अर्थ आहे ज्यामध्ये पर्यावरण संस्कृती वाढली पाहिजे असं आहे आणि या वाढण्याचे प्रतीक म्हणजे तो वड आहे हा वड अविरत वाढत असतो त्याच्या पारंब्या जमिनीमध्ये जाऊन त्या परत रुजत असतात आणि अशा रीतीने तो वड फार मोठा होत असतो परंतु आपण काय वाढवायचं आणि काय कमी करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे परंतु नवीन पिढीला हे समजलं तर फारच छान होईल परंतु आपण समजावण्याचा प्रयत्न केला एवढाच आपला प्रयत्न असतो समजून घेणं त्यांचं काम आहे आणि जी वैराग्यता आहे आपल्या भक्ती भावांमध्ये वैराग्यत आहे ही वैराग्य त्यात दिसल पाहिजे भगवद् गीते मध्ये सत्व गुण, राजच गुण आणि तमो गुण सांगितलेले आहे यामध्ये ही वडाची पूजा सत्वगुणात येते परंतु तिथं राजच गुण आणि तमोगुण सुद्धा आलेला दिसतो म्हणून आदर करा सासूचा आदर करा नंदेचा आदर करा आपल्या ज्येष्ठांचा आदर करा त्याचप्रमाणे मना मध्ये द्वेष असू नये आई-वडील म्हातारे झाले म्हणून त्यांचा उपयोग नाही मग त्यांना काहीतरी टोमणे देणे आणि तुम्ही काय केलं आमच्या साठी असं बोलणं हे चुकीच आहे शेवटी हे जग आई-वडिलांनी आपल्याला दाखवलेल आहे तेच खरे आधार वड आहेत त्यांच्याविषयी आपण सद्भावनेने आदरानेच वागायला हवं आणि या जगात खरा ईश्वर आई आणि वडील आहे ज्यांचे ईश्वर कृपेने ते जिवंत आहेत त्यांनी त्यांना कधीही विसरू नये धन्यवाद.



gclubvip888

Tue, 06 Jun, 2023 07:26

gclub888888 good game form thailand

gclubfish888

Tue, 06 Jun, 2023 07:31

การเล่น Casino Online ที่สามารถรองรับระบบของ ทางเข้าจีคลับ ในการเข้าใช้งานผ่านทาง มือถือ และ คอมพิวเตอร์ PC ได้ทุกระบบ

Monaree

Tue, 12 Sep, 2023 01:05

ทำกำไรจากเกมสล็อตที่นี่ไม่ผิดหวังคนนิยมเล่นเยอะที่สุดบริการด้วยระบบออโต้มีเกมถึง200 เกมแจ็คพอตแตกบ่อยที่สุดลุ้นรับเงินรางวัลตลอดการเข้าเล่นเกมสล็อตpgแท้ทำเงินได้ทุกวัน ไม่มีจำกัดเวลาการเล่นสมัครสมาชิกฟรีใช้เวลาไม่กี่นาทีเ

UFAAUTO789

Thu, 28 Sep, 2023 06:24

ยูฟ่าสล็อต789 ทางเข้าเล่น UFABET เว็บตรงแทงบอล และคาสิโนออนไลน์ดีที่สุด2023 สล็อต PG ทดลองเล่น เล่นฟรีทุกค่าย เล่นได้ก่อนใคร

Leave a Reply